श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय १२

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  १२
          श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय बारावा या बद्दल जाणून घेणार आहोत.
          बाळप्पा गुरूंचा ध्यास घेऊन अक्कलकोट येथे येण्यासाठी गाणगापूरहून निघतात. आणि येताना श्री स्वामींना नैवेद्य म्हणून, सोबत श्री स्वामींच्या आवडीची खडीसाखरही घेतात. श्री स्वामींच्या कृपेनेच अवघ्या दोन दिवसात बाळप्पा गाणगापूरहून अक्कलकोटात पायी चालतच पोहोचतात. 
          तेव्हा श्री स्वामी खासबागेत होते. आणि जमीनीवर निजले होते. श्री स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची खुप गर्दी जमली होती. या गर्दीत आपल्याला श्री स्वामींचे दर्शन घडेल का या विवंचनेत असताना, श्री स्वामींनी आपल्या एका सेवेकर्याला बाळप्पांना जवळ घेऊन येण्यास सांगितले. 
          श्री स्वामींचे अजानुबाहू आणि तेजःपुंज रूप पाहून भक्तीने बाळप्पांचे मन समाधी अवस्थेत गेले. आणि श्री स्वामींनी उठून खासबागेतील प्रत्येक झाडांना प्रेमाने मिठी मारून, बाळप्पा वरचे प्रेम प्रकट केले. बाळप्पा भानावर येताच त्यांनी श्री चरणास घट्ट मिठी मारली. आपल्या आनंदाश्रूंनी जणू श्री स्वामी चरणांस त्यांनी अभिषेकच केला. श्री स्वामी दर्शन घेऊन बाळप्पा धन्य झाले. 
          अक्कलकोट येथे श्री स्वामींच्या सेवेची दुरवस्था होत आहे हे बाळप्पांच्या निदर्शनास आले. श्री स्वामी सेवकांमध्ये सेवेवरुन रोज भांडणे होत होती. परंतु बाळप्पांनी सर्व भांडणे मोडून काढली. आणि मठातील प्रत्येक सेवेकर्याला आपापली सेवा नेमून दिली. यामुळे बाळप्पा श्री स्वामीचे प्रिय शिष्य बनले. यामुळे मठातील काही सेवकरी तसेच सुंदरा बाई बाळप्पांचा द्वेष करीत.
          बाळप्पांनी श्री स्वामी सेवेची योग्य पद्धत अमलात आणली. श्री स्वामींच्या पुजेपासून ते दर्शना पर्यन्त सर्व व्यवस्था चोख पार पडू लागल्या. 
          या दरम्यान बाळप्पांसोबत एक विलक्षण घटना घडली. बाळप्पा पोट दुखीच्या व्याधीने त्रस्त झाले. काही वर्षांपूर्वी कोण्या कृतघ्नाने बाळप्पांना कानोल्यातून विष खाऊ घातले होते. पण बाळप्पांच्या नशीबी श्री स्वामी सेवा करने असल्यामुळे श्री स्वामी कृपेने ते आजवर जिवंत होते. आणि श्री स्वामी कृपेने ते विष त्यादिवशी बाळप्पांच्या बेंबीतून बाहेर पडले. आणि बाळप्पा आश्चर्यकारकरित्या बचावले. 
          श्री स्वामी सेवे सोबतच बाळप्पा शिव शंकराची आराधना, भक्ती करत. परंतु सुंदरा बाईंनी बाळप्पाना शंकर पूजन वर्ज्य करण्यास सांगितले. आणि श्री स्वामींच्या आज्ञेने म्हणजेच चिठ्ठ्या टाकून बाळप्पांनी शिव शंकराची पूजा करने थांबविले.
          ही भाणगड श्रीपाद भटांनी पाहीली. श्रीपाद भट आणि काही सेवेकरी बाळप्पांचा द्वेष करीतच होते. म्हणून श्रीपाद भट एकदा बाळप्पांना भेटले आणि म्हणाले आपण आल्यापासून आमचे खुप नूकसान होत आहे. तेव्हा तुम्ही आपल्या गावी परतावे. तेव्हा आपण श्री स्वामी आज्ञा घेऊन गावी परतू असे‌ बाळप्पांनी सांगितले.
          तेव्हा श्रीपाद भटाने दोन चिठ्ठ्या टाकून पाहिले तर चिठ्ठीत, बाळप्पांनी इथेच राहून चाकरी करावी असे‌ लिहीलेले होते. श्री स्वामी कृपा झाली तर श्री स्वामी आपल्या शिष्याला कसे दूर लोटतील?
          पुढे बाळप्पा सदैव श्री स्वामी सेवेत रूजू झाले. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या बाराव्या अध्यायाची समाप्ती होते.
               श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.

         

         थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||
थोडे नवीन जरा जुने